आपत्कालीन प्रसंगी मदत कार्यासाठी तत्पर असणाऱया बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या २ चमू ह्या अनुक्रमे रायगड व कोल्हापूरच्या दिशेने रवाना - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

मंगळवार, २७ जुलै, २०२१

demo-image

आपत्कालीन प्रसंगी मदत कार्यासाठी तत्पर असणाऱया बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या २ चमू ह्या अनुक्रमे रायगड व कोल्हापूरच्या दिशेने रवाना

आपत्कालीन प्रसंगी मदत कार्यासाठी तत्पर असणाऱया बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या २ चमू ह्या अनुक्रमे रायगड व कोल्हापूरच्या दिशेने रवाना

मुंबई, दादासाहेब येंधे : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना विविध नागरी सेवा सुविधा अव्याहतपणे देणारी आपली बृहन्मुंबई महानगरपालिका आपत्कालीन परिस्थितीच्या प्रसंगी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राबाहेर देखील तत्परतेने मदत कार्य करीत असते. याच अनुषंगाने आज बृहन्मुंबई महानगरपालिकेची २ पथके रायगडच्या व कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाली आहेत. रायगड व कोल्हापूरच्या दिशेने मार्गस्थ झालेल्या पथकांचे नियोजन हे  अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. पी. वेलरासू आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) श्री. सुरेश काकाणी यांच्या मार्गदर्शनात करण्यात येत आहे.

मुंबई महानगरपालिकेचा एक चमू रायगड जिल्ह्यातील महाड येथे मदत कार्य करण्यास रवाना झाला आहे. यामध्ये दोन वैद्यकीय चमू, १ फिरती वैद्यकीय प्रयोगशाळा, घन कचरा व्यवस्थापन खात्यातील सुमारे ७५ कर्मचारी, पाण्याचे ४ टँकर, १ टोइंग लॉरी इत्यादींचा समावेश आहे. याबाबत वैद्यकीय विषयक बाबींचे व्यवस्थापन हे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ.मोहन जोशी हे करीत आहेत. तर आपत्कालीन व्यवस्थापन विषयक कार्यवाही ही बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाचे संचालक श्री. महेश नार्वेकर करीत आहेत.

कोल्हापूर येथील पूर बाधित परिसरातील पर्जन्य जलवाहिन्या आणि मलनिस्सारण वाहिन्यांविषयी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या दृष्टीने बृहन्मुंबई महानगरपालिकेची आणखी एक चमू आज कोल्हापूरकडे रवाना झाला आहे. कोल्हापूरच्या दिशेने प्रस्थान केलेल्या संबंधित कर्मचाऱ्यांच्या चमुसोबत 'रिसायकल मशीन' आणि इतर आवश्यक यंत्रसामग्री देखील पाठविण्यात आली आहे.महापालिकेची यंत्रणा वापरत असताना यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप मुख्य अभियंता श्री.सुनील सरदार यांचीही मदत घेण्यात येत आहे.

रत्नागिरी जिल्हाधिकारी यांनी केलेल्या विनंतीनुसार, चिपळूण शहरातील पूरस्थिती पश्चात मदत कार्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने दोन ट्रक माऊंटेड सक्शन मशीन आणि ५० स्वच्छता कामगार आवश्यक त्या साधनांसह चिपळूण येथे रवाना झाले आहेत.

 सन २०१९ मध्ये कोल्हापुरात अशाच स्वरूपाची पूर परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळीही बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागांतर्फे कोल्हापुरात विविध नागरी सेवा सुविधा सुसज्ज करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी अहोरात्र मेहनत घेत होते.       














(जसंवि/२४५)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *