माता-भगिनींवर अत्याचार करणाऱ्यांवर जरब बसवा - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

मंगळवार, १४ सप्टेंबर, २०२१

demo-image

माता-भगिनींवर अत्याचार करणाऱ्यांवर जरब बसवा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना; महिला सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत आढावा बैठक

मुंबई : माता भगिनींची टिंगल-टवाळी खपवून घेतले जाणार नाही हे आपण छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकलो आहोत. त्यामुळे त्या सुरक्षित राहिल्या पाहिजेत. यासाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. त्यासाठी पूर्ण पाठबळ देण्यात येईल. अत्याचार करणाऱ्यांवर जरब बसावा यासाठी जो काही संदेश द्यावा लागेल त्यासाठी प्रयत्न करा असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल दिले.

महिला व बालकांच्या सुरक्षेबाबत पोलीस मुख्यालयात झालेल्या गृहविभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, पोलीस संचालक संजय पांडे यांच्यासह विविध पोलीस आयुक्तालयाचे वरिष्ठ अधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक दृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, राज्यातील महिला सुरक्षेबाबत धोरण म्हणून कोणते प्रयत्न करता येतील याचा विचार करावा लागेल. निराधार पदपथ, रेल्वेस्थानक, बसस्थानक अशा ठिकाणी आश्रय घेणाऱ्या महिलांसाठी किमान रात्रीचा निवारा साठी सोय करता येईल का याबाबत केंद्राच्या सहकार्याने प्रयत्न करावे लागतील आणि अनेक घटनांमध्ये तपास केंद्र यंत्रणांकडे द्या अशी मागणी केली जाते पण अशा प्रतिक्रियांमधून पोलिसांचे मनोबल यांचे खच्चीकरण होऊ नये याची जबाबदारी घ्यावी लागेल.

मुख्यमंत्र्यांनी दिलेले निर्देश

* गुन्ह्यात रिक्षांचा वापर झाल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले, त्यावर रिक्षांच्या अनधिकृत हस्तांतरणाला घालावा.

* त्याबाबत नोंदणी करतानाच, स्थानिक पोलिसांकडे माहिती देण्याचे संबंधित परवानाधारकाला बंधनकारक करावे.

* इतर राज्यातून येणाऱ्यांची नोंद ठेवावी.

* जलदगती न्यायालयातून निकाल लागतो. पण शिक्षेच्या अंमलबजावणीबाबत आणि पुढील न्यायालयीन प्रक्रिया बाबत सुधारणा करण्याचे प्रयत्न व्हावेत.

Hon+CM



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *