मुंबई, दि. २२ : मुंबई शहर व उपनगरामध्ये शुक्रवार दुपारपासून सुरू झालेला पावसामुळे मुंबईतील सखल भाग पुन्हा जलमय झाला. त्यामुळे पाण्याचा निचरा करण्यासाठी कसरत करावी.

विमानतळाच्या दिशेने येणाऱ्या-जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडीचा पावसामुळे वाहनचालकांना मोठा सामना करावा लागला. किंग्ज सर्कल, चुनाभट्टी, वडाळा, सायन, दादर टी.टी., चेंबूर, हिंदमता सिनेमा या भागातही साचलेल्या पाण्यामुळे वाहनचालकांना पर्यायी मार्गाने जाताना मोठा वळसा घालावा लागत होता. साधारण १५ ते २० मार्गावरील बेस्ट बस अन्य मार्गाने वळवल्याची माहिती बेस्ट उपक्रमाने दिली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा