कोरोनाची दुसरी लाट थोपवण्यासाठी सरकारने विविध प्रयत्न चालविले आहेत. नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्याचेही आदेश देण्यात आलेले आहेत. तर दुसरीकडे जनजागृती मोहिमही मोठया प्रमाणात सूरु आहे. पण, हे सर्व सुरू असताना जनतेनेही सरकारला प्रतिसाद देणे गरजेचे आहे.
* मास्क लावणे, विनाकारण घराबाहेर पडणे या नियमांचे पालन करायलाच हवे. सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देणे गरजेचे आहे. लॉक डाऊन असल्यामुळे नागरिकांनीही काल (रविवार १६ मे) घरी बसणे पसंत केले.
* विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांची संख्याही कमी दिसत होती.
* नेहमी गजबजलेले रस्ते रिकामे होते.
* रस्त्यावर शुकशुकाट दिसत होता.
अशाच प्रकारे नागरिकांनी सरकारला सहकार्य केले तर निश्चितच कोरोना हरेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा