मुंबई : कोरोनाचा सर्वाधिक आर्थिक फटका हा हंगामी व्यावसायिकांना बसला आहे. मुंबईतील कुंभारवाड्यामध्ये नवरात्रीची लगबग सुरू झाली आहे. मात्र, नवरात्रीसाठी पूजल्या जाणाऱ्या गरबींना(मातीचे घट) मिळणाऱ्या अल्प प्रतिसादामुळे येथे निरुत्साहाचे वातावरण आहे. यापूर्वी दहीहंडीसारखा महत्त्वाचा उत्सवही त्यांच्या हातून कोरोनामुळे निसटला होता. त्यामुळे गरबी बनविणाऱ्यांच्या नजरा आता दिवाळीकडे (पणत्या बनविण्याकडे) लागल्या आहेत.
0 टिप्पण्या