गृहमंत्र्यांकडून कौतुक : कोरोना नियंत्रणासाठी विविध उपाययोजना
मुंबई, दादासाहेब येंधे: धारावी परिसरात कोरोना विरुद्धच्या लढ्यात धारावीकरांनी बाजी मारल्याने मोठा दिलासा मिळाला असून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी एक नवा 'धारावी पॅटर्न' समोर आला आहे. या मोहिमेत नागरिक, आरोग्य विभाग , लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्त्यांबरोबरच पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या मोलाच्या कामगिरीबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली आहे. कोरोना मुक्तीसाठी धारावी परिसरात झालेले प्रशासन, प्रशासन आणि जनता यांचे एकत्रित प्रयत्न आणि त्यामुळे कमी होत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या याची जागतिक आरोग्य संघटनेनेही दखल घेतली आहे ही बाब निश्चितच मोठ्या प्रमाणात दिलासा देणारी असल्याचे सांगून ते म्हणाले, कि धारावी परिसरात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून पोलिस यंत्रणा तातडीने सतर्क झाली. अत्यंत दाट लोकवस्ती, अरुंद गल्ल्या यातून केवळ एका वेळी एकच व्यक्ती जाऊ शकते अशी परिस्थिती.
त्यामुळे सोशल डिस्टंसिंग पाळणे हे अत्यंत कठीण होते. त्यावर नियंत्रण करण्यासाठी पोलिसांनी विविध माध्यमातून जनजागृती सुरू केली. पोलिसांच्या गाडीतून ध्वनिक्षेपकाद्वारे माहिती देणे, ड्रोनचा उपयोग करून त्यावरील ध्वनिक्षेपकाद्वारे लोकांना माहिती देऊन जागृत करणे, तसेच काही प्रसंगी नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करून त्यांना कोरोनाचे दुष्परिणाम समजावून सांगणे. अशा प्रकारची कामे पोलिसांनी केली.
तसेच कोरोनाबद्दल काय दक्षता घ्यावी याची ऑडिओ क्लिप बनवून त्याचे प्रसारण व्हाट्सअप ग्रुपद्वारे केले. सामाजिक सुरक्षा अंतर राखून मीटिंग घेऊन त्याद्वारे, तसेच मंदिर, मशिद यातील लाऊडस्पीकरद्वारे लोकांपर्यंत माहिती पोहोचवली. अरुंद गल्ल्यांमधून पायी गस्त घालून लोकांमध्ये जनजागृती केली. लॉक डाऊनच्या कालावधीत तीन एसआरपीएफ तुकड्या, सशस्त्र पोलिस दलातील १०० पोलीस अंमलदार व धारावी पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांसह ३८ वेळा रूट मार्च व २८ कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले. या कालावधीत धारावीत ४० कर्मचारी व १० राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानांना कोरोनाची लागण झाली. त्यावर मात करून हे कर्मचारी पुन्हा कर्तव्यावर रुजू झाले.
तसेच कोरोनाबद्दल काय दक्षता घ्यावी याची ऑडिओ क्लिप बनवून त्याचे प्रसारण व्हाट्सअप ग्रुपद्वारे केले. सामाजिक सुरक्षा अंतर राखून मीटिंग घेऊन त्याद्वारे, तसेच मंदिर, मशिद यातील लाऊडस्पीकरद्वारे लोकांपर्यंत माहिती पोहोचवली. अरुंद गल्ल्यांमधून पायी गस्त घालून लोकांमध्ये जनजागृती केली. लॉक डाऊनच्या कालावधीत तीन एसआरपीएफ तुकड्या, सशस्त्र पोलिस दलातील १०० पोलीस अंमलदार व धारावी पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांसह ३८ वेळा रूट मार्च व २८ कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले. या कालावधीत धारावीत ४० कर्मचारी व १० राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानांना कोरोनाची लागण झाली. त्यावर मात करून हे कर्मचारी पुन्हा कर्तव्यावर रुजू झाले.
0 टिप्पण्या