गुन्हे शाखेने केला ३७४ किलो गांजा जप्त - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

शनिवार, १७ फेब्रुवारी, २०२४

गुन्हे शाखेने केला ३७४ किलो गांजा जप्त

मुंबई, दि. १७ : मुंबईत जळगावहून दोन गाड्यातून गांजा आणण्यात आला होता. पण, भांडुप परिसरातील ती वाहने येताच गुन्हे शाखेच्या युनिट-५ च्या पथकाने गांजाची तस्करी पकडली. तब्बल ३७४ किलो वजनाचा व एक कोटी १२ लाख रुपये किमतीचा गांजाचा साठा पकडल्याने गांजा तस्करांचे धाबे दणाणले आहेत. 


भांडुप परिसरात दोन वाहनातून गांजाचा साठा येणार असल्याची खबर युनिट-५ ला मिळाली होती. त्यानुसार उपयुक्त दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी निरीक्षक घनश्याम नायर, निरीक्षक येरेकर, गोंधळी, सपोनि माळी, जाधव, खेडकर व पथकाने भांडुप येथील ऐरोली नाका दिशेने जाणाऱ्या मार्गावर सापळा रचून ती दोन्ही वाहने पोलिसांनी अडवली. त्या वाहनांची तपासणी केली असता त्यात ३७४ किलो गांजाचा साठा मिळून आला. या गांजाची तस्करी करणाऱ्या दोघांना पकडल्यानंतर चौकशीत त्याने जळगाव येथील हा गांजा मुंबईत आणल्याचा व तो गांजा देणाऱ्या एका व्यापाऱ्याचे नाव सांगितले. त्यानुसार पोलिसांनी गोपाळ नेटलेकर, शरद पाटील, सुनील मोहिते अशा तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. आता हा गांजा ते कुठल्या ठिकाणी कोणाला देणार होते त्याचा शोध पोलीस घेत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज