शनिवार, १७ फेब्रुवारी, २०२४
गुन्हे शाखेने केला ३७४ किलो गांजा जप्त
मुंबई, दि. १७ : मुंबईत जळगावहून दोन गाड्यातून गांजा आणण्यात आला होता. पण, भांडुप परिसरातील ती वाहने येताच गुन्हे शाखेच्या युनिट-५ च्या पथकाने गांजाची तस्करी पकडली. तब्बल ३७४ किलो वजनाचा व एक कोटी १२ लाख रुपये किमतीचा गांजाचा साठा पकडल्याने गांजा तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
भांडुप परिसरात दोन वाहनातून गांजाचा साठा येणार असल्याची खबर युनिट-५ ला मिळाली होती. त्यानुसार उपयुक्त दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी निरीक्षक घनश्याम नायर, निरीक्षक येरेकर, गोंधळी, सपोनि माळी, जाधव, खेडकर व पथकाने भांडुप येथील ऐरोली नाका दिशेने जाणाऱ्या मार्गावर सापळा रचून ती दोन्ही वाहने पोलिसांनी अडवली. त्या वाहनांची तपासणी केली असता त्यात ३७४ किलो गांजाचा साठा मिळून आला. या गांजाची तस्करी करणाऱ्या दोघांना पकडल्यानंतर चौकशीत त्याने जळगाव येथील हा गांजा मुंबईत आणल्याचा व तो गांजा देणाऱ्या एका व्यापाऱ्याचे नाव सांगितले. त्यानुसार पोलिसांनी गोपाळ नेटलेकर, शरद पाटील, सुनील मोहिते अशा तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. आता हा गांजा ते कुठल्या ठिकाणी कोणाला देणार होते त्याचा शोध पोलीस घेत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
Tags
# क्राईम

About दादा येंधे
'वृत्त रिपोर्टर' जनसामान्यांच्या हितासाठी, शोषित, पीडित, वंचित समाज घटकांवर होणारा अन्याय -अत्याचार प्रकरणी वाचा फोडण्याचे काम करेल. गुन्हेगारीविषयक बातम्यांच्या माध्यमातून जनतेने सावध राहावे, सतर्क राहावे आणि योग्य तो सकारात्मक बोध घ्यावा असा मुख्य उद्देश आहे. गुन्हेगारी संपविण्यासाठी कायदा व सुव्यवस्था योग्य राखण्यासाठी वेळोवेळी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन आपणास या माध्यमातून करण्यात येत आहे.
क्राईम
Tags
क्राईम
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
Post Top Ad
Your Ad Spot
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा