मुंबई : मुंबईतील चेंबूर येथील भारतनगर येथे काल मुसळधार पावसामुळे भिंत कोसळून मोठी जीवितहानी झाली. यात पाच घरांचे नुकसान झाले आहे. यात १९ जणांवर काळाचा घाला घातला गेला.
शनिवारी मध्यरात्रीनंतर एक वाजता चेंबूर येथील न्यु भारत नगर येथे संरक्षक भिंतीचा भाग घरांवर कोसळला. त्यामुळे चार ते पाच घरांवर कोसळून झालेल्या दुर्घटनेतील जखमींना घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यापूर्वी १६ रहिवाश्यांचा मृत्यू झाला होता.


0 टिप्पण्या