Ticker

6/recent/ticker-posts

आतापर्यंत मुंबईचा नियोजनबद्ध विकास झाला नाही मुख्यमंत्री

पर्यावरण रक्षणाचा, विकास कामांची ग्वाही...

कोणत्याही नियोजनाशिवाय मुंबई वाढत गेल्याची कबुली देतानाच या वाढलेल्या मुंबईला आणि येथील लोकसंख्या ला आखीवरेखीव नियोजनबद्ध सुविधा पुरविणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी दिली. मुंबईसारख्या गर्दीच्या ठिकाणी विकासकामे करणे एखादे नवीन शहर वसविण्यापेक्षा आव्हानात्मक काम आहे. ही आव्हाने सोडवत मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकार काम करत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.  एमएमआरडीएच्या वांद्रे येथील कलानगर जंक्शन उड्डाणपुलाचे काम मार्गी के चे उद्घाटन शिवडी ते वरळी उन्नत मार्ग प्रकल्पाचे भूमिपूजन बीकेसी सायकल ट्रॅक व पथदर्शी पदपथांची लोकार्पण तसेच स्मार्ट वाहनतळ असे मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले यावेळी महापौर किशोरी पेडणेकर, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री अनिल परब, कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह स्थानिक आमदार, खासदार एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आरे राजू अतिरिक्त महानगर आयुक्त के. एच. गोविंदराज तसेच अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की, यापुढे मुंबईचा सुनियोजित विकास करण्यावर भर देण्यात येईल. मुंबईच्या विकासासाठी पायाभूत सुविधांची कामे सुनियोजितपणे तसेच पर्यावरणाचे जतन करण्यात करण्यावर भर देणार आहे. मुंबईत वाहतूक समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. यावर स्मार्ट पद्धतीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्यासाठी पार्किंगची व्यवस्थाही आधुनिक पद्धतीने करावी लागेल. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर भर देताना ती सर्वांना परवडणारी कशी होईल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मुंबईसारख्या शहरात आजही सायकल चालवली जाते, यासाठी स्वतंत्र ट्रॅक करणे गरजेचे आहे. ही सर्व कामे करत असताना पर्यावरण रक्षण करण्यावरही भर देण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या