चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. 1 एप्रिल, 2015 पासून दारुबंदी लागू केल्यानंतर मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यात वाढलेले अवैध दारुचे प्रमाण, वाढलेली गुन्हेगारी याचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला.
शासनाने
1 एप्रिल 2015 पासून संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात दारु विक्रीचे आणि दारू पिण्याचे
परवाने रद्द करून संपूर्ण जिल्ह्यत दारूबंदी लागू केली होती. या दारूबंदीच्या
अनुषंगाने जुलै, 2018 मध्ये विधानसभेमध्ये झालेल्या चर्चेच्या वेळी
तत्कालीन राज्य उत्पादन शुल्क मंत्र्यांनी समिती नेमण्याबाबत आश्वासन दिले
होते. त्यानुषंगाने सेवानिवृत्त माजी
प्रधान सचिव रमानाथ झा यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून तिचा अहवाल 9 मार्च 2021
रोजी शासनास सादर करण्यात आला.
दारूबंदी उठविण्यामागील प्रमुख कारणे
झा
समितीने काढलेल्या निष्कर्षाप्रमाणे दारूबंदीची अंमलबजावणी मोठ्या प्रमाणावर अपयशी
ठरली असून, जिल्ह्यात अवैध हातभट्टी दारू आणि बनावट दारू काळ्या बाजारात
उपलब्ध होत आहे. ही दारू अतिशय घातक आहे.
यातून दारूचा काळाबाजार देखील वाढला आहे. शासनाचे वैध दारू विक्रीमधून मिळणाऱ्या
महसूलाचे मोठे नुकसान झाले आहे व गुन्हेगारी क्षेत्रातील खासगी व्यक्तींचा प्रचंड
आर्थिक फायदा झाला आहे. बेकायदेशीर दारू व्यापारात स्त्रिया आणि मुले यांच्या
वाढत्या सहभागामुळे चिंता निर्माण करण्यासारखी परिस्थिती झाली आहे. तसेच, दारुबंदीच्या
बाबतीत बहुसंख्य संघटना, नागरिक व रहिवाशांनी दारुबंदी मागे
घेण्याच्या बाजुने कौल दिला आहे. या
कारणांमुळे झा समितीने दारुबंदी उठविण्याबाबत निष्कर्ष काढला आहे.
दारुबंदीमुळे गुन्हेगारीत वाढ
दारुबंदीमुळे
चंद्रपूर जिल्ह्यात असामाजिक प्रवृत्ती व गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ
झाली. दारूबंदीपूर्वी म्हणजे 2010-2014 या
काळात 16 हजार 132 गुन्हे दाखल झाले होते.
दारूबंदीनंतर म्हणजे 2015-2019 या काळात 40 हजार 381 गुन्हे दाखल करण्यात
आले. दारूबंदीपूर्वी 1729 महिला
गुन्हेगारीची प्रकरणे होती. दारूबंदीमध्ये
4042 महिलांवर गुन्हे दाखल करण्यात आले, तर बालकांचा अवैध दारूसाठी वापर
करण्याची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली.
दारूबंदीमुळे महसुलात तूट
चंद्रपूर
जिल्ह्यात दारूबंदीमुळे गेल्या 5 वर्षात 1606 कोटी रुपये इतके राज्य उत्पादन
शुल्कात नुकसान झाले. तर 964 कोटी रुपये विक्रीकर बुडाला असे एकंदर 2570 कोटी
रूपयांचा महसूल शासनास मिळू शकला नाही.
नागरिकांची मोठ्या प्रमाणावर निवेदने
0 टिप्पण्या