अनैतिक संबंधातून तरुणाची हत्या - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

गुरुवार, १ जून, २०२३

अनैतिक संबंधातून तरुणाची हत्या

 कांदिवली गोळीबार प्रकरण

मुंबई दि. १ : कांदिवली येथे रविवारी सकाळी गोळीबार करून तरुणाची झालेली हत्या ही अनैतिक संबंधातूनच झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोपी रोहित पाल याने दोन वेळा मुंबई देऊन रेकी केली होती. अखेर रविवारी त्याने मनोज चौहान यांचा खून केला असे पोलिसांकडून सांगण्यात आले.


रविवारी सकाळी केस कापण्यासाठी जात असतानाच रोहित पाल याने रस्त्यातच मनोजला गाठून त्याच्या डोक्यात गोळी झाडली. त्यानंतर तेथून पळालेल्या रोहितने पवन एक्सप्रेसने थेट युपी गाठले. मात्र, कांदिवली पोलिसांना रोहित युपीला पळून गेल्याचे समजताच रेल्वे पोलीस व आरपीएफच्या मदतीने रोहितला प्रयागराज रेल्वे स्थानकात पकडले. दरम्यान रोहित आणि मृत मनोज यांच्या पत्नीचे प्रेमसंबंध होते. याची मनोजला माहिती होती. यावरून बऱ्याचदा त्यांच्यात वाददेखील होत होते. डिसेंबर महिन्यात रोहितला मारहाणदेखील करण्यात आली होती. त्यानंतरही रोहित आणि मनोजची पत्नी संपर्कात होते. दरम्यान रोहितने मनोज काटा काढायचे ठरवून दोन वेळा मुंबई ठेवून रेकी केली होती. अखेर रविवारी रोहितने मनोजला कायमचे संपवले. 


रोहित दहावीत असताना मनोजची पत्नी बारावीत होती. तेव्हा एका मित्राच्या माध्यमातून दोघांची ओळख झाली होती. मनोजचे लग्न झाल्यानंतर त्या दोघांचे प्रेमसंबंध जुळले होते. अखेर हे प्रेम संबंध मनोजच्या जीवावर बेतले. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज