मुंबई, दि. २२: पश्चिम रेल्वेने हरित उपक्रमांतर्गत वेगवान लोकलच्या वाऱ्याच्या मदतीने पवनचक्क्यांमधून मधून वीज निर्मितीचा चंग बांधला आहे. या पवनचक्क्यांच्या टर्बाईन जवळून लोकल गेल्यावर त्यांचे पंखे फिरतील आणि विजेची निर्मिती होणार आहे. त्यानुसार खार आणि नायगाव परिसरात लहान आकाराच्या पवनचक्क्या कार्यान्वीतही झाल्या आहेत. या प्रकारच्या प्रकल्पाच्या चाचण्यांसही सुरुवात झाली आहे.

0 टिप्पण्या