मुंबई : महाराष्ट्रात आज (१० एप्रिल) वीकेंड लॉकडाऊन सुरु झाला आहे. सोमवारी (१२एप्रिल ) सकाळी ७ वाजेपर्यंत हा लॉकडाऊन कायम राहणार आहे. या लॉकडाऊनदरम्यान मुंबईतील अनेक शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लोकांनी घरातच राहावे, असे आवाहन केले जात आहे. अनेक ठिकाणी लॉकडाऊनला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. दरम्यान उगाचच घराबाहेर पडणाऱ्या लोकांवर कारवाईही केली जात आहे.







0 टिप्पण्या