मुंबई,दि.१ : शिवराज्यभिषेक सोहळा ३५० व्या वर्षात पदार्पण करीत असल्याच्या निमित्ताने ३५० दुचाकीसह सहभागी झालेल्या महिलांच्या विशेष बाईक रॅलीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
राज्य शासनाचा पर्यटन विभाग आणि अमेझिंग नमस्ते फॉउंडेशन यांच्या वतीने या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा, पर्यटन संचालक बी.एन.पाटील उपस्थित होते. ऑगस्ट क्रांती मैदान ते दादरच्या सावरकर स्मारक पर्यंत ही रॅली काल सकाळी काढण्यात आली होती.
1452
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा