हुश्श!, मुंबई जिंकली
मुंबई, दि. १० : रॉयल चॅलेंज बंगळुरु संघाने प्रथम फलंदाजी करत मुंबई संघापुढे २०० धावा करण्याचे आवाहन ठेवले होते. या आवाहनाचा पाठलाग करताना मुंबईने हा सामना ६ विकेटने जिंकला. ईशान किशनने ४२ धावा केल्या. त्यांनतर आलेल्या सुर्यकुमारने मैदानात चौफेर फटकेबाजी करीत ३५ चेंडूत ७ चौकार आणि ६ षटकारांसह दमदार फलंदाजी करीत ८३ धावांची तुफानी खेळी केली. त्याबरोबरच त्याने आयपीएल मधील ३००० धावांचा टप्पा पार केला.

0 टिप्पण्या